Opinion

दांडपट्टा…

मराठ्यांच सर्वात आवडीचं हत्यार…

दांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. तलवारबाजीतील कौशल्याचा सुंदर आविष्कार म्हणजे दांडपट्टा. पट्टा ही वजनाने हलकी परंतु घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खूप चांगला उपयोग होई.

दांडपट्ट्याची भेदकता तलवारीहुन जहाल …

उभ्या हिंदुस्थानात या शस्त्रावर मराठ्यांइतके नियंत्रण कोणाचेच नव्हते. मुघल, राजपुत लढवय्यांमध्येही हे हत्यार असायचे. पण मराठे यात जास्त कुशल अन तरबेज होते. पट्टा फ़िरवणे मोठे कौशल्याचे काम आहे. खुप कसब आणि अभ्यास असलेला माणुसच पटटा व्यवस्थित फिरवू शकतो.

मावळे १६ हात लांब पट्टाही वापरत, याला बेल्टप्रमाणे कंबरेभोवती गुंडाळले जाई, सय्यद बंडाला जिवा महालाने १६ हात लांबून कलम केले होते.

म्हणतात ना :- मराठे‬ ‪‎सहसा पेटत नाही… आणि पेटले तर‬ ‪‎लवकर विझत नाही‬त…

छोट्याश्या लिंबाचे दोन तुकडे या पट्ट्याने होतात. आपण मराठीत “पटाईत” हा शब्द वापरतो, म्हणजे तरबेज… मुळात पट्टे चालवण्यात वाकबगार असलेल्या लोकांना पटाईत असे म्हणले जाते .तोच शब्द पुढे आपल्या बोली भाषेत रुढ झाला. मराठी हशमांमध्ये एक म्हण होती “धारकरी ” म्हणजे जे व्यक्ती तलवार, भाला, तीर कमान अथवा अजुन अशाच काही ४-५ हत्यारांमध्ये तरबेज असली की त्यांना “धारकरी” गणले जायचे.. अन अजुन एक म्हण होती की “दहा धारकरी तर एक पट्टेकरी ” यावरुनच पटाईताला काय मान असेल हे लक्षात येते.

पट्ट्याची एकूण लांबी ५ फूट असते. त्याचे पाते ४ फूट असुन त्याची मुठ म्हणजे खोबळा साधारण १ फुटाचा असतो. त्याचे पाते लवचिक असते पण लवचिक असले तरी याच्या कौशल्याने केलेल्या वाराने उभा माणुस चिरला जाऊ शकतो. गर्दन देखील कटू शकते. पट्टा चालवणारा जणु काही आपल्या भोवती १० फुटांचा पोलादी घेर उभा करतो. त्यात प्रवेश केल्यावर साक्षात मृत्यूच.

दोन्ही हातात पट्टा घेणारा पटाईत हा अतिकुशल समजला जातो. याचे कौशल्य अन प्रहार क्षमता साहजिकच दुप्पट असते. याची काही वैशिष्ट्ये आहेत… म्हणजे याचे पाते जरी लवचिक असले तरी पण याची वार करण्याची तलवारीपेक्षा क्षमता जास्त असते… का?… याचे मुख्य कारण म्हणजे, आपण तलवार फिरवताना सगळा जोर आपल्या मनगटातुन लावत असतो पण प्रत्यक्षात पट्टा फिरवताना आपला पूर्ण हात, दंड, खांदे आणि बरागड्यांचा भाग या सर्व अवयवांतूून ताकद लागलेली असते…

पाते लवचिक असले तरी जर वार करताना पाते लपकले नाही अन् वार सरळ झाला तर सरळ एक घाव दोन तुकडे होतात.

आज याचा प्रयोग फक्त साहसी खेळाच्या प्रदर्शनात केला जातो. हातातली सळसळणारी पाती वापरून अफाट कौशल्य दाखवायचं असतं. सध्या पट्टयाने नारळ, केळी, बटाटे कापले जात असले, तरी पूर्वी तोंडात धरलेली लवंग दांडपट्ट्यानं कापली जायची. मात्र लवंग दातात धरलेल्या इसमाला कसलीच इजा व्हायची नाही.

मर्द मावळ्यांनी आपल्या पराक्रमाने आणि पुरुषार्थाने स्वराज्य घडवले… त्यांना आमचा साष्टांग दंडवत..!

चला आपल्या पूर्वजांचा हा पुरुषार्थ आपण पुढे नेऊया…

भगवा आमचा झेंडा ,भगवे आमचे रक्त…
प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त…
सळसळतं राहु दे मर्द मराठ्यांचे रक्त ..!!

Back to top button