News

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ६ कोटी ७५ लाख नागरिक मायदेशी परतले

मुंबई, दि. २२ मार्च : कोरोना काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत ६ कोटी ७५ लाख नागरिक मायदेशी परतले आहेत.     

कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी जगभरात विमान वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे मायदेशी परतण्याचे सर्व पर्याय बंद झाल्याने परदेशात जागोजागी अडकलेल्या भारतीय नागरिकांचे हाल होत होते. ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ‘वंदे भारत’ ही मोहीम आखली. या मोहिमेंतर्गत जगाच्या कोनाकोपऱ्यात अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला परत आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button