Special Day

‘फ़कीरा’कार अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे एक समाज सुधारक होते त्यासोबत साहित्यकार, कवी, लेखक, कादंबरीकार, लावणी, पोवाडे, अश्या वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले नामांकित मराठी साहित्यिक म्हणून देखील अण्णाभाऊ साठे यांना ओळखले जाते.आपण जरी अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखत असलो तरी अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव ” तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे” असे आहे.अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्यील वाटेगाव या  गावामध्ये झाला.अण्णाभाऊ भाऊ साठे यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले नाही तरी देखील त्यांनी अक्षर ज्ञान प्राप्त करून घेतले.

औपचारिक शिक्षणाचा अभाव असूनही अण्णाभाऊ साठे यांनी मराठीतील 35 कादंबर्यांत एक लेख लिहिले. त्यातील एक म्हणजे फकिरा (1959). सध्या 1961 च्या फकीराला 1961 मध्ये राज्य सरकारचा सन्मान मिळाला. अण्णाभाऊ साठेच्या लघुकथांचे 15 संग्रह आहेत. त्यांच्या बर्याच मोठ्या कथांची संख्या बर्याच भारतीय आणि 27 नॉन-भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहे.

अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातील एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी इयत्ता साहित्य प्रकार त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर आणि अशिक्षित असे व्यक्ती अण्णाभाऊ साठे यांनी या क्षेत्रामध्ये आपले महत्त्वाचे कामगिरी बजावली.आपल्या जीवन प्रवासामध्ये अनेक कथा, कादंबऱ्या, नाट्य, लोकनाट्य, चित्रपट, लावण्या, गवळण, प्रवास वर्णन आशा प्रकार सशक्त आणि समृद्ध केले.

स्वतंत्र पूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात देखील अण्णाभाऊ साठे यांनी राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्र राज्यात पूर्णता जनजागृती केली.आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम यांसारख्या आंदोलनांमध्ये त्यांनी आपले सहकार्य दाखवले.

अण्णाभाऊ साठे आणि आपल्या जीवनामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी साहित्य रचना केली. त्यांनी आपल्या अल्पायुष्य मध्ये 21  ग्रंथ संग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबरीची रचना केली.अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या सातपेक्षा अधिक कादंबऱ्या वर मराठी चित्रपट देखील काढलेले आहेत. तर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या “फकीरा” या कादंबरीला 1961 ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी चा पुरस्कार मिळाला आणि मराठी साहित्य मध्ये आपले महत्त्वाचे योगदान देणारे वि. स. खांडेकर यांनी देखील या कादंबरीचे कौतुक केले.

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

Back to top button